महाराष्ट्रातील हा सर्वात मोठा महामार्ग तीन दिवस राहणार बंद! काय कारण जाणून घ्या

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Samruddhi Highway : मुंबई ते नागपूर असा अवघ्या काही तासांत प्रवास शक्य करून देणारा समृद्धी महामार्ग सध्या राज्यातील सर्वात महत्त्वाच्या दळणवळण मार्गांपैकी एक ठरला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राला जोडणाऱ्या या महामार्गामुळे प्रवाशांचा वेळ वाचतोच, पण व्यापार, उद्योग आणि शेतीसाठीही मोठी सोय झाली आहे. दररोज लाखो वाहनांची वर्दळ असलेल्या या महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी आता एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. Samruddhi Highway

जर तुम्ही येत्या काही दिवसांत समृद्धी महामार्गावरून प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर ही माहिती आधी जाणून घेणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण 27 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2025 या तीन दिवसांत समृद्धी महामार्ग काही ठिकाणी दररोज साधारण तासाभरासाठी बंद ठेवला जाणार आहे. मात्र संपूर्ण महामार्ग बंद राहणार नसून, निवडक ठिकाणी आणि ठराविक वेळेतच वाहतूक थांबवली जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नगरगावंडी आणि टिटवा या गावांच्या परिसरात हा तात्पुरता बंद लागू राहणार आहे. 27 डिसेंबर रोजी नगरगावंडी गावाजवळ मुंबईकडील वाहिनी दुपारी 2 ते 3 किंवा 3 ते 4 या वेळेत बंद ठेवली जाणार आहे. 28 डिसेंबर रोजी याच ठिकाणी नागपूरकडील वाहिनी दुपारी 2 ते 3 किंवा 3 ते 4 या कालावधीत बंद राहणार आहे.

तसेच 29 डिसेंबर रोजी टिटवा गावाजवळ मुंबई तसेच नागपूरकडील दोन्ही वाहिन्या सकाळी 11 ते दुपारी 12 किंवा दुपारी 12 ते 1 या वेळेत बंद ठेवल्या जाणार आहेत. या काळात संबंधित मार्गावरून वाहतूक थांबवली जाणार असल्याने प्रवाशांनी पर्यायी वेळ किंवा मार्गाचा विचार करूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, या तात्पुरत्या बंदामागचं कारणही महत्त्वाचं आहे. समृद्धी महामार्गावर सध्या दर महिन्याला दहा लाखांहून अधिक वाहने धावतात. वाढती वाहतूक लक्षात घेता महामार्गावर अत्याधुनिक सुविधा उभारण्याचं काम सुरू आहे. धामणगाव ते चांदूर रेल्वे दरम्यान गॅन्ट्री बसवण्याचं काम राज्य रस्ते विकास महामंडळाकडून केलं जाणार असून, त्यासाठीच हा मार्ग ठराविक वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे.

काम पूर्ण झाल्यानंतर महामार्गावरील वाहतूक व्यवस्थापन अधिक सुरक्षित आणि सुरळीत होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे हा तात्पुरता त्रास भविष्यातील मोठ्या सोयीसाठी असल्याचं सांगितलं जात आहे. तरीही, या तीन दिवसांत समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांनी वेळेचं नियोजन नीट करूनच घराबाहेर पडावं, असा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

( Disclaimer: वरील दिलेली माहिती ही प्रसारमाध्यमांच्या आधारे आहे याबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाही)

हे पण वाचा | महाराष्ट्रात लवकरच मोठा महामार्ग होणार! केंद्र सरकारची मंजुरी पहा कसा असणार रूट

Leave a Comment