Vande Bharat Railway : पुणे आणि नागपूर… महाराष्ट्राच्या विकासाची दोन मजबूत चाके. एकीकडे शिक्षण, आयटी, उद्योगांची राजधानी असलेले पुणे तर दुसरीकडे विदर्भाची उपराजधानी नागपूर. या दोन शहरांदरम्यान दररोज हजारो प्रवासी शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि कौटुंबिक कारणांसाठी प्रवास करत असतात. याच प्रवाशांचा वेळ वाचावा, प्रवास अधिक सोयीचा व्हावा म्हणून सुरू करण्यात आलेली नागपूर–पुणे वंदे भारत एक्सप्रेस अल्पावधीतच प्रवाशांची लाडकी ठरली आहे. Vande Bharat Railway
2025 मध्ये सुरू झालेली ही वंदे भारत एक्सप्रेस आज पुणे ते नागपूर हा लांबचा प्रवास कमी वेळेत आणि आरामदायी बनवत आहे. सकाळी गाडी पकडली की संध्याकाळपर्यंत दुसऱ्या टोकाला पोहोचता येत असल्याने विद्यार्थी, नोकरी करणारे कर्मचारी, व्यापारी वर्ग आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये या ट्रेनला प्रचंड पसंती मिळत आहे. मात्र सध्या या गाडीला असलेले फक्त 8 डबे अनेकदा अपुरे पडत असल्याची तक्रार प्रवाशांकडून होत आहे.
याच पार्श्वभूमीवर आता पुणेकरांसाठी आणि विदर्भवासीयांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. नागपूर–पुणे वंदे भारत एक्सप्रेसच्या डब्यांची संख्या वाढवण्याबाबत रेल्वे प्रशासनाकडून सकारात्मक हालचाली सुरू झाल्या आहेत.
नुकताच मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विवेककुमार गुप्ता नागपूर दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसबाबत महत्त्वाचे विधान केले. प्रवाशांकडून या गाडीला मिळणारा प्रतिसाद आणि वाढती मागणी पाहता डबे वाढवण्याच्या प्रस्तावावर सकारात्मक विचार सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यांच्या या विधानामुळे प्रवाशांमध्ये मोठी आशा निर्माण झाली आहे.
सध्या अजनी (नागपूर) ते पुणे दरम्यान धावणारी ही वंदे भारत एक्सप्रेस 8 डब्यांची आहे. मात्र प्रस्तावानुसार या गाडीला आणखी 8 अतिरिक्त डबे जोडण्याचा विचार सुरू आहे. जर हा निर्णय प्रत्यक्षात आला, तर या मार्गावर तब्बल 16 डब्यांची वंदे भारत एक्सप्रेस धावताना दिसू शकते. यामुळे तिकीट उपलब्धतेची समस्या कमी होईल, वेटिंग लिस्ट घटेल आणि अधिक प्रवाशांना या वेगवान ट्रेनचा लाभ घेता येईल.
खरे तर पुणे–नागपूर मार्गावर प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शिक्षणासाठी पुण्यात जाणारी विदर्भातील तरुणाई, नोकरीसाठी नागपूरकडे जाणारे पुणेकर, तसेच उद्योग-व्यवसायाच्या निमित्ताने सतत प्रवास करणारा वर्ग या सगळ्यांसाठी ही ट्रेन मोठा आधार ठरत आहे. त्यामुळे डबे वाढवण्याची मागणी ही केवळ मागणी न राहता गरज बनली आहे.
मात्र या संपूर्ण प्रस्तावावर अंतिम निर्णय रेल्वे
मंत्रालयाकडूनच घेतला जाणार आहे. 2026 मध्ये या संदर्भात मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर मंत्रालयाने हिरवा कंदील दाखवला, तर पुणे नागपूर वंदे भारत एक्सप्रेसचा प्रवास आणखी सोयीचा आणि आरामदायी होणार आहे.
आता सर्वांच्या नजरा रेल्वे मंत्रालयाच्या निर्णयाकडे लागल्या आहेत. डबे वाढले तर प्रवाशांचा त्रास कमी होईल आणि पुणे-विदर्भ जोडणी आणखी मजबूत होईल. ही बातमी पुणेकरांसह नागपूरकरांसाठीही नक्कीच दिलासादायक ठरणारी आहे.
(Disclaimer: वरील दिलेली माहिती ही प्रसारमाध्यमांच्या आधारे आहे याबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाही )
हे पण वाचा | १३१ किमीचा नवा रेल्वेमार्ग मंजूर! नाशिक–मुंबई प्रवासच बदलणार, ४४ गावांमध्ये भूसंपादन सुरु संपूर्ण माहिती वाचा
1 thought on “पुणेकरांसाठी मोठी बातमी! वंदे भारत रेल्वे बाबत केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, प्रवाशांवरती होणार परिणाम?”