मी शाळेच्या वेबसाईट वरती शालेय जीवना सोबत डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मसाठी नियमितपणे बातम्या व माहितीपर लेख लिहितो. सरकारी योजना, राज्य व केंद्र सरकारचे निर्णय, रस्ते व पायाभूत सुविधा प्रकल्प, ग्रामीण-शहरी विकास, तसेच सामान्य नागरिकांवर परिणाम करणाऱ्या महत्त्वाच्या घोषणांचा सखोल अभ्यास करून त्या सोप्या आणि समजेल अशा भाषेत मांडणे हा माझा मुख्य उद्देश आहे.
सध्याच्या वेगवान डिजिटल युगात सरकारी निर्णयांची खरी आणि अचूक माहिती वेळेत लोकांपर्यंत पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे. कॉलेजचा माध्यमातून मी अधिकृत स्रोत, सरकारी परिपत्रके, अधिसूचना आणि विश्वासार्ह मीडिया रिपोर्ट्सच्या आधारे बातम्या तयार करतो. कोणती योजना कुणासाठी आहे, अर्ज कसा करायचा, लाभ कसा मिळतो आणि त्याचा थेट फायदा सामान्य माणसाला कसा होतो – यावर विशेष भर दिला जातो.
ग्रामीण भागातील नागरिक, विद्यार्थी, शेतकरी, कामगार आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना उपयुक्त ठरेल अशी माहिती देणं हेच कॉलेजचा चं ध्येय आहे. वाचकांचा विश्वास टिकवून ठेवत, सत्य, स्पष्ट आणि उपयोगी माहिती देण्याचा प्रामाणिक प्रयत्न सतत केला जातो.